Breaking News
Loading...
Wednesday, 19 May 2010

Info Post


एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव,
पण नंतर वाटल तुझ
तुला कळतय का ते पहाव,

जेव्हा तुझी आस असायची
तेव्हा तूच निराश करायचास,
अन जेव्हा आस मनी नसायची
तेव्हा सुद्धा तूच मनात ज्योत जागवायचास,

मनाच्या समुद्रात उठलेल्या
वादळला तूच प्रवृत्त करायचा,
तर कधी त्याच वादलाला
शांत सुद्धा तू करायचास,

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
साथ तुझी असावी,
दुरावलेल्या माझ्या भावनानी
सांगड़ तुझ्या हृदयाशी घालावी,

कधी हो तर कधी नाही
कधी आपुलकी तर कधी दुरावा,
गोंधळलेल्या मनाचा हात
मी तरी कसा धरावा,

म्हणून एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव…



0 comments:

Post a Comment