Breaking News
Loading...
Wednesday, 16 June 2010

Info Post

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.
 

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.



आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.


आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्रि घेतलेल्या शपथेचा
शब्द न  शब्द आठवून बघ.


आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत  घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश  लाटेच  वीरघळन बघ.



आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.

----अनघा---- 


0 comments:

Post a Comment