गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली
अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही .. स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही .. ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ... अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या
पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ... कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या .. दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ... माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..
मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे . तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ... पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं .. आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...
आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ... कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ... त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ... ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..
0 comments:
Post a Comment